Monday, May 23, 2011

भारत आणि श्रीलंका वर्ल्ड-कप फ़ायनल मँच मध्ये कोणाची सरशी होईल





भारत आणि श्रीलंका वर्ल्ड-कप फ़ायनल मँच मध्ये कोणाची सरशी होईल असा प्रश्न एका क्रिकेट रसिक जातकाने मला विचारला होता.
या प्रश्नासाठी मला २६२ नंबर जातकाने दिला होता. त्याची प्रश्न नवमांश कुडंली खालील प्रमाणे आहे.
मी प्रथम प्रश्न नवमांश कुडंलीचे पहिले घर खालील प्रमाणे काढले.
२६२ ला १२भागुन आलेली बाकी १० आली या प्रमाणे प्रश्न नवमांश कुडंली मांडलेली आहे.
मी या प्रश्ना साठी खालील प्रमाणे नियमलावला:
जर प्रश्न नवमांश कुंडलीचा षष्ठेश जर प्रश्न कुंडली मध्ये ६ आणि ११ या स्थानाचा कार्येश असेल व तसेच प्रश्न नवमांश कुंडलीचा ११ व्या
स्थानाचा मालक जर प्रश्न कुंडली मध्ये ६ किंवा ११ व्या स्थानाचा कार्येश असेल तर प्रतिस्पर्धी संघावर मात करुन (भारताला) यश प्राप्त होईल हे ऊघड होते.
तसेच या नियमानुसार प्रश्न नवमांश कुंडलीचा षष्ठेश बुध असुन तो
तत्कालिन प्रश्न नवमांश कुंडलीचा षष्ठ स्थानाचा मालक बुध असुन तो प्रश्न कुंडलीमध्ये षष्ठ स्थानात असुन तो ११ व्या स्थानाचा मालक आहे. व तसेच प्रश्न नवमांश कुंडलीचा लाभेश मंगळ असुन तो शनिच्या नक्षत्रात आहे व हा शनि प्रश्न कुंडली मध्ये लाभ स्थानात आहे.
(ज्यावेळेला दोन पेक्षा जास्त ग्रह वक्री असतात त्यावेळेस वक्री ग्रहांचा नियम लागू होत नाही.)
वरील नियमाची पुर्ती होऊन त्यामुळे मी पटकन त्या क्रिकेट रसिक जातकाला सांगितले की भारताचा विजय होईल हे भाकीत मी ३१/३/११ ला त्याला सांगितले त्यानुसार २/४/११ ला भारत श्रीलंका वर्ल्ड-कप फ़ायनल मँच खेळली गेली आणि शेवटी भारताच्या पारड्यात विजश्री पडली. या अगोदर सेमी फ़ायनलचे मँच मध्ये भारत विरुध्द पाकिस्थान यात कोण फ़ायनला जाईल हे सुध्दा त्यावेळी मांडलेल्या प्रश्न नवमांश कुंडलीवरुन सांगितले होते. ती कुंडली आपण केव्हा तरी पुढे बघु........!

Thursday, May 15, 2008

जन्मकुंडलीच्या राशीमधील ग्रहा नुसार सामान्यतः माणसाचा स्वभाव असतो



अभ्यास करा: वरील कुडंलीतले प्रथम घराला जिथे 1आकडा आहे त्या स्थानाला लग्न स्थान असे म्हणतात हे स्थान लग्न घर म्हणुन ओळखले जाते. यात ज्यावेळेस जन्म झाला त्यावेळेच्या आकाशातल्या ग्रह गोलांच्या नकाशा नुसार लग्न घरातली राशी ह्या स्थानात येते.थोड्क्यात हे स्थान fix असते.जन्मवेळेनुसार प्रमाणे रास फ़क्त बदलत असते.वरील उदारणात मेष राशीचे
लग्न उदित आहे म्हण्जेच ज्योतिषाच्या भाषेत ही मेष लग्नाची कुडंली आहे.अशा बारा राशीच्या जन्मलग्न कुडंल्या तयार होतील कारण एका राशीचे जन्म लग्न हे जवळ्जवळ दोन तास ईदित असते म्हण्जे अहोरात्री 24तासात 24/2 असे बारा लग्न उदित होतात.


******************************

जन्मकुंडलीच्या राशीमधील ग्रहा नुसार सामान्यतः माणसाचा स्वभाव असतो.
*मेष राशीत ग्रह असल्यात माणसाचा स्वभाव चटबट्या (fighting nature) असतो.
*वृषभ राशीत ग्रह असल्यात माणसाचा स्वभाव आज्ञापालन करणारा विनयशील(submissive )असतो.
*मिथुन राशीत ग्रह असल्यात माणसाचा स्वभाव दुस-याचा तिरस्कार करणारा (hating nature)असतो.
*कर्क राशीत ग्रह असल्यात माणसाचा स्वभाव भावनाप्रधान(emotional)असतो.
*सिंह राशीत ग्रह असल्यात माणसाचा स्वभाव कर्तबगार ,वस्तुंचा हव्यास असणारा (उदा.टीव्ही ,फ़्रिज हवेच(possessive) असतो पुढील भागात पाहुया 27 नक्षत्रांचा कुडलींतला प्रवास......त्याचे महत्व...
*कन्या राशी .....पुढील भागात पाहु...या!
त्यासाठी वाचत रहा....बना ऊत्कॄष्ट ज्योतिषी ...वाचा आणि शिका ......“भविष्याची गुरुकिल्ली”
या सर्दंभातआपले प्रश्न ,आपले अभिप्राय जरुर कळवा.

पंचमहाभुतांवरुन माणसाचा स्वभाव ,शरीर प्रकृती,बुध्दीमत्ता कशी समजते

आज पंचमहाभुतांवरुन माणसाचा साधारणतः स्वभाव ,शरीर प्रकृती,बुध्दीमत्ता कशी समजते ते पाहु या जन्मवेळेवर पुर्व दिशेला जी रास उदित असते तिला जन्मलग्न (Risesing ascendentant)असे म्हणतात.
या लग्ना (Risesing ascendentant )मध्ये जर अग्नितत्वाच्या या राशी उदित असल्यास त्या माणसाने/जातकाने जगामध्ये Leadership मध्ये पुढाकार घ्यावा.Leadership करावी.
तसेच पृथ्वी तत्वाच्या 2,6,10 (वृषभ vrishbha Taures, कन्या kanny Virgo , मकर makar Capricorn पॄथ्वीराशी राशी)लग्ना उदित असल्यास त्या जातकाने व्यापार,शेती वगैरे उद्योग करावा.
तसेच या वायुराशी 3,7,11 मिथुन mithun Gemini ,तुळ tula Libra ,कुंभ kumbh Aquarius ) वायुराशी्चे लग्न उदित असल्यास त्या जातकाने नोकरी- सेवा(Job) करावी तसेच या जलराशी 4,8,12( कर्क karkk Cancer , वॄश्चिक vrishikk Scorpio मीन meen Pisces जलराशीचे लग्न उदित असल्यास ज्ञानदानाचे कार्य करावे उदा.लेक्चरर ,टीचर ईत्यादी.
अग्निराशी 1,5,9 या राशी लग्नात उदित असल्यास माणसाची शारिरीक रोग प्रतिकार शक्ति चांगली असते.
पॄथ्वीराशी 2,6,10 या राशी लग्नात उदित असल्यास व वायुराशी 3,7,11 या राशी उदित असल्यास माणसाची रोगप्रतिकार शक्ति साधारण असते.
जलराशी 4,8,12 राशी लग्नात उदित असल्यास माणसाची शारिरीक प्रकृति कमकुवत असते व रोग प्रतिकारशक्ति कमी असुन साथीच्या रोगांना बळी पडातात.विषेशतः लहान मुलांना हा त्रास जास्त होतो.वरील तत्वांचा आपल्या जन्मकुंन्डलीत उपयोग करुन अभिप्राय जरुर कळवा.